मांजरा धरणातील पाण्यावरील आरक्षण तसेच सिंचन व्यवस्थेचा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा अपव्यय टाळून काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

 

मांजरा धरणातील पाण्यावरील आरक्षण तसेच सिंचन व्यवस्थेचा
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा
अपव्यय टाळून काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन






लातूर प्रतिनिधी : १ जानेवारी २१ :
   मांजरा धरणात उपलब्ध असलेला एकूण पाणीसाठा आणि त्यावर असलेले पिण्यासाठीच्या पाण्याचे आरक्षण, शिवाय रब्बी हंगाम सिंचनासाठी सोडवयाचे पाणी या अनुषंगाने शुक्रवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आढावा घेतला. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले जावे, त्याचा थोडाही अपव्यय होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
   मांजरा धरण या वर्षी शंभर टक्के भरले असून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे, त्या संदर्भाने  पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी  पाणीसाठा आणि त्यावरील आरक्षण, कालव्याची दुरुस्ती, वीज उपलब्धता व इतर बाबीचा आढावा घेतला. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत नितनवरे व इतर सहकाऱ्यांनी या संदर्भातील सर्व माहितीचे यावेळी सादरीकरण केले.
    मांजरा धरणातील २२४.०९३ दलघमी पैकी १७६.९६३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे ४७.१३ दलघमी मृतसाठा आहे. लातूर महानगर पालीका, लातूर एमायडिसी, कळंब शहर पाणीपुरवठा, अंबाजोगाई शहर पाणीपुरवठा, केज धारूर येथील १२ गावे पाणीपुरवठा तसेच लातूर, कळंब, ऊस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने असे एकूण ३२.७३२ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण  आहे. तर सिंचनासाठी १०८ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. ६८.०८ दलघमी पाणी बाष्पीभवनामुळे वाया जाण्याची शक्यता आहे तर १४.८४८ दलघमी एवढा पाण्यात गाळ असण्याची शक्यता धरण्यात आली आहे.
  मांजरा धरणातील पाण्यावर लातूर, बीड उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील एकूण १८ हजार २२३ हेक्टसर क्षेत्र सिंचनाखाली येत असून रब्बी हंगाम तसेच उन्हाळ्यात दोन्ही कालव्याद्वारे पाणी  सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली, थकित पाणीपट्टी अपुरा कर्मचारी वर्ग तसेच वाहन व्यवस्थेस संबंधी यावेळी चर्चा करण्यात आली.
---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या