ग्रामपंचायत या पवित्र मंदिराला डाग लागू नये याची काळजी घ्या - पेरे पाटील

 ग्रामपंचायत या पवित्र मंदिराला डाग लागू नये याची काळजी घ्या - पेरे पाटील. 





औशात आ.अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार संपन्न. 







औसा - सरपंचमुळेच देशाचा विकास होवू शकतो आपले वागणे आपले बोलणे आपले चालणे शुद्ध राहिल्यास गावही आपल्या सोबत राहते चांगल्या ठरावाव्दारे आपण आपल्या गावचा विकास करु शकतो गावाच्या विकासासाठी आपणहूनच लोकांच्या कल्याणासाठी चांगले कायदे करु शकतो.आमदार खासदार यांना काम करणे सोपे असते पण एखाद्या सरपंचाला गावकी सांभाळणे अवघड काम असून यावरही मात करुन आपल्या गावच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीला पवित्र मंदिर समजून काम करण्याची वृत्ती सर्व सरपंचांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्या हातून होणारी चूक आपल्या या पवित्र मंदिराला डाग लागेल असे कृत्य आपल्या हातून होवू नये असे आवाहन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच व्याख्याते भास्कर पेरे पाटील यांनी केले आहे.



                 दि.२८ जानेवारी रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी औसा व निलंगा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सर्वच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.याप्रसंगी पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांच्या कामाचे कौतुक करीत मनरेगा अंतर्गत आपल्या गावचा विकास आपण साध्य करु शकतो फक्त आपले डोके ठिकाणावर असले पाहिजे असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत शेतरस्ते, गोटे यासह विविध विकास कामांना ग्रामपंचायत स्तरावर हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम हा अंत्यत चांगला असून शेतरस्ता कामात आपला निधी वळवत ग्रामीण भागातील विकास साध्य करण्याचा पॅटर्न आगामी काळात सर्वानांच फायदेशीर ठरणारा आहे.लोकाना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातीसाठी कर वसुली हि महत्वाची आहे.आम्हाला कर्ज काढून मदत करणारे सरकार नको सरकारच्या नफ्यातून आम्हाला मदत करणारे सरकार हावे.आपणही आपल्या गावचा विकास साध्य करण्यासाठी आशाच प्रकारे काम करणे आवश्यक असून आपले दुर्दैव असे की आपल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना माती परीक्षण हेच माहित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त.


______________________________



ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक - आ. अभिमन्यू पवार.



गावाचा विकास करायचा असेल तर आमदार, खासदार यांची गरज नाही.आपण ठरवले तर आपल्या गावचा विकास एका कृती आराखडय़ातून होवू शकतो. यासाठी आपली मानसिकता गरजेची आहे.आपण एकदा कृती आराखडा तयार केला तर तो बदलण्याचा अधिकार जिल्हाधिकारी किंवा सरकारला अधिकार नाही. मी निवडून आल्यापासून ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करायची असेल तर शेतीला जोडधंदयाची गरज आहे. सुरुवातीला तुती लागवड याबाबत मी कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना आवाहन केले होते कि नगदी पीक म्हणून तुती लागवडीकडे पाहा मतदारसंघातील ६०० शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली होती.पण दुर्दैवाने तुती लागवड संदर्भात असलेली यंत्रणा कुचकामी असल्याने कृषी विभागाला जोडावी हि मागणी शासनाकडे केली आहे.लवकरच याबाबतीत निर्णय होईलच.माझ्या प्रयत्नामुळे तुतीला शेती पिकाचा दर्जा मिळाला आहे.आपल्या भागातील मुले शेती परवडत नसल्याने शहरात जावून हाताला मिळेल ते काम करत आहेत.अतिवष्टीने काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेल्याच्या घटना व वेळेवर रास न झाल्याने बनीमा जाळल्याचा घटना पाहाणीस आल्या काढणीस आलेले शेतीमाला वाहतूकीस शेतरस्ते नसतील तर हे दुर्दैव आहे म्हणून ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक असून शेतरस्ते हे ग्रामीण अर्थ व्यवस्थेची नस असल्याचे सांगून माझा तीन वर्षांचा आमदार निधी शेतरस्ते विकासासाठी प्रस्तावित केला आहे.याचा भाग नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४० किलोमीटरचे शेतरस्ते प्रस्तावाला मंजुरीस दिले आहेत. लवकर हे कामे सुरू होणार आहेत.



यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,भाजपचे जेष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, अॅड अरविंद कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते,प्रा.भिमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे,संतोष मुक्ता,ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशना जाधव, कल्पना डांंगे,दिपक चाबुकस्वार आदीसह मोठ्या संख्येने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या