शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे निवेदन

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम आदमी पार्टीचे निवेदन







 महाराष्ट्र शासन केंद्र शासन मार्फत नाफेड मार्फत हरभरा हमीभाव केंद्र चालु करण्यात आले होते से दिनांक 23/05/2022 पर्यंत चालू होते. केंद्र शासनाने दिनांक 29/05/2022 रोजी पर्यंत शेतक-यांचा ऑनलाईन केलेल्या) हरभरा खरेदी करणेस मान्यता दिली होती मात्र अचानक शासनाचे खरेदी पोर्टल बंद करण्यात आले आहे .ज्यामुळे अनेक ऑनलाईन केलेल्या शेतक-यांचे हरभरा धान्य त्यांचे घरी पडून आहेत. शासनाने अचानक बंद केलेल्या खरेदी पोर्टलमुळे व्यापा-यानी हेतुपुरस्सर भाव पाढले असून सामान्य शेतक-यांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक करून अंदाजे 4200/- रुपये पर्यंत मात्र देण्यात येत आहे. शासनाने हेतुपुरस्सर सदरील खरेदी पोर्टल बंद केल्यामुळे सामान्य शेतक-यांची मोठी अडचण झाली आहे. सदरील खरेदी केंद्रास 15 दिवसाची मुदतवाढ देवून शेतक-यांस (कुणव्यास) दिलासा दयावा. त्याची आर्थिक पिळवणूक थांबवावी, हरभरा खरेदी केंद्रास मुदतवाढ न दिल्यास शेतकरी शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन, उपोषण करतील परिणामास शासन जबाबदार राहील, आमची मागणी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांना तात्काळ कळवून शेतक-यांची (कुणब्याची मागणी मान्य करावी अशी आम आदमी पार्टीच्या वतीने औसा तहसीलदार यांना आज दिनांक 27 मे 2022 शुक्रवार रोजी निवेदन सादर केले यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अनील मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख,मिडीया प्रमुख मुख्तार मणियार,उपशहराध्यक्ष अली कुरेशी,आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या