उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढला: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी काढले आदेश
उस्मानाबाद-( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात ०१ सप्टेंबर पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा स. ०९ ते ०७ तर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आस्थापना स. ०९ ते सांय ०५ या वेळेत सुरू राहतील. तसेच यापुढे आता शनिवारी ऐवजी दर रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. असा आदेश नूतन जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.०१/०९/२०२० रोजी काढला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.