लातूर व उस्मानाबादच्या रेल्वे प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहे ,, मुबंई- पुणे - लातूर , बिदर - मुबंई , कोल्हापूर - पुणे रेल्वे सेवा 1 जुलै पासुन सुरु ...

 लातूर व उस्मानाबादच्या रेल्वे  प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहे ,,   मुबंई- पुणे - लातूर , बिदर - मुबंई , कोल्हापूर - पुणे रेल्वे सेवा 1 जुलै पासुन सुरु ...



उस्मानाबाद : प्रतिनिधी अल्ताफ शेख,,  कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून खंडित असणारी रेल्वेसेवा आता पूर्ववत सुरू होणार आहे . लातूर येथून धावणाऱ्या बिदर - लातूर -मुंबई , कोल्हापूर - नागपूर या रेल्वे गाड्या दि . १ जुलैपासून पुन्हा प्रवाशांना सेवा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली . 


उस्मानाबाद येथून पुणे - मुंबई साठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे मात्र उस्मानाबाद येथून स्वतंत्र रेल्वे नसल्याने उस्मानाबाद ( UMD ) जिल्ह्यातील नागरिकांना मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन उस्मानाबाद पुणे-मुंबई यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी वारंवार नागरिकांतून व रेल्वे संघर्ष समिती कडून होत आहे मात्र आत्तापर्यंत विभागीय सोलापूर कार्यालयाने कोणतीही दखल घेतलेली नाही.


लातूर येथून धावणाऱ्या पुणे-मुंबई , बिदर-लातूर -मुंबई ही गाडी चालू झाल्याने लातूरच्या व उस्मानाबादच्या प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की 1 जुलै पासुन दोन्ही गाड्यांची ऑनलाइन तिकीट बुकिंग पंधरा दिवसापूर्वी पासून सुरू झाली होती 30 जुन पर्यंत च्या सर्वच गाड्याचे तिकीट बंद करण्यात आले होते.  1 जुलै पासून च्या  दोन्ही गाड्या सुरु झाल्याची अधिकृत माहिती आज प्राप्त झाली आहे.


मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे रेल्वेसेवा थांबविण्यात आली होती.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेल्वेकडून खबरदारी म्हणून वाहतूक थांबविण्यात आलेली होती . मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.रुग्णसंख्या घटलेली आहे रेल्वेने काही मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरु केलेली आहे . 


लातूरातून धावणाऱ्या या दोन्ही गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम यांनी केली होती. यासंदर्भात रेल्वेच्या महाप्रबंधकांसमवेत त्यांनी परत पत्रव्यवहारही केलेला होता . या मागण्यांची दखल घेत महाप्रबंधकांनी दि .१ जुलै पासून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होत असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे .


लातूर येथून आठवड्यातील ४ दिवस लातूर - मुंबई तर ३ दिवस बिदर- मुंबई ही रेल्वे पूर्वी धावेल .याशिवाय कोल्हापूर नागपूर ही रेल्वेही लातूरातून जात असे . पूर्वीप्रमाणेच या दोन्ही रेल्वे गाड्या दि .1 जुलै पासून धाऊ लागतील , असे निजाम शेख यांनी सांगितले . 


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे . त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने आपली मागणी मान्य केली आहे तरी देखील प्रवाशांनी कोरोना विषयक सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करावे . कोरोनाचा संसर्ग अधिक वाढणार नाही याची दक्षता घेऊनच प्रवास करावा . मास्क आणि शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करुन स्वतःसह इतर प्रवाशांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी , असे आवाहन निजाम शेख यांनी केले आहे . याबाबत दैनिक एकमत या वर्तमानपत्राने ही बातमी प्रकाशित केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या