प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 -पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. 15 जुलै 2021

 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 -पिक विमा हप्ता

भरण्याची अंतिम मुदत दि. 15 जुलै 2021





 

 

              लातूर, दि.30(जिमाका):- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत लातूर जिल्हृयाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई या कंपनीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केलेली आहे. सदर योजना बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्‍छीक असून पिक विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतीम मुदत दि.15 जुलै 2021 देण्यात आली आहे. या योजनेत जिल्हयातील सोयाबीनतूरमुगउडीदबाजरीख.ज्वारीव कापुस या पिकाचा समावेश करण्यात आला आहे.

        कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत  कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. सदर योजनेमध्ये सोयाबीनमुगउडीद ख.ज्वारीतुर पिकासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील महसुल मंडळ क्षेत्र (नवीन 60 महसुल मंडळसह) बाजरी सर्व तालुके व कापुस पिकासाठी औसानिलंगाशि.अनंतपाळ वगळून इतर सर्व तालुके व अहमदपुर तालुक्यातील सर्व मंडळ ‍  अधिसूचित करण्यात आलेली आहेत.

        या योजनेअंतर्गत शेतक-यांने भरावयाचा विमा हप्ता दर वा्स्तवदर्शी दराने आकारण्यात आला असुन अन्न्धान्य्‍ व गळीतधान्य्‍ पिकासाठी 2 टक्के व नगदी कापुस पिकासाठी 5 टक्के असा राहील.

       सदर योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे प्रति हेक्टरी संरक्षित रक्क्म (कंसाबाहेरील आकडे) व शेतक-यांने भरावयाचे विमा हप्ता (कंसामधील आकडे) असेल.

       जिल्हयातील प्रमुख पिके सोयाबीन-45000/-(रु.900/)-, तुर-35000/-(रु.700), मुगव उडीद प्रत्येकी 20000/- (रु.400),कापुस-45000/-(रु.2250), ख.ज्वारी-25000/-(रु.500), बाजरी 22000/-(रु.440).

       प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांना टाळता न योण्याजोग्या कारणामुळे जसेपिक पेरणी पासुनकाढणी पर्यंत उत्पादनात विविध कारणामुळे येणारी उत्पादकतेतील घटप्रतिकूल हवामान घटकामूळे पेरणी/लावणी/उगवण न होणे (असे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त असल्यास)हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील झालेली नुकसानस्थानिक नैसर्गिक आपत्ती  व काढणी पाश्चात नुकसान या बाबीचा समावेश असेल.

             अर्जदाराने पिक विमा प्रस्ताव सादर करताना आधारकार्ड /आधार नोंदणीची प्रत 7/12 उताराभाडेपट्टा करार असलेला करारनामा/सहमतीपत्रपेरणी घोषणापत्र  आणि बॅक पासबूकाची प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रॉनीक सांक्षांकन करणे बंधनकारक आहे. तसेच आपला मोबाईल क्र. नमूद करुन आधार क्रमांकाचे स्वयं साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पिक विमा पोर्टलला महाभूलेख संकेतस्थळाचे एकत्रीकरण कार्यान्वयीत झाल्यामूळे विमा पोर्टलवर संबंधीत शेतकऱ्यांच्या जमिन धारणेची पडताळणी होणार असल्याने पुन्हा अर्जासोबत 7/12 उतारा अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही.

 याकरीता विमा हप्त्या व्यतिरीक्त सी.एस.सी. केंद्रामार्फत कोणतेही शूल्क घेण्यात येऊ नये. तसे आढळल्यास संबंधीतावर कारवाई करण्यात येईल. कर्जदार शेतक-यांच्या पिक विमा हप्ता संबंधित बॅकेकडुन तर बिगर कर्जदार शेतकरी जवळच्या प्राधिकृत बॅकेतून, नागरी सुविधा केंद्र (CSC Centre) अथवा स्वत: संकेत स्थळावरुन विमा हप्ता भरु शकतील.

शेतक-यांनी अधिसुचित पिकांसाठी एका क्षेत्रासाठी एकाच वेळी आणि एकाच विमा कंपनीकडुन विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. यामध्ये काही गैरप्रकार निर्देशनास आल्यास सदर क्षेत्राचा विमा हप्ता जप्त्‍ करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. इच्छुक शेतक-यांना अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात, भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा www.pmfby.gov.in या संकेत स्थळावरून माहिती उपलब्ध्‍ करुन घेता येईल.

       शेतक-यांची सदर योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली अंतिम मुदत 15 जुलै 2021 आहे.तसेच कर्जदार शेतक-यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पिक बदलाबाबत सुचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापुर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल.  आपल्या पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बॅकेत नागरी सुविधा केंद्रात किंवा स्वत: संकेतस्थळाला भेट देऊन पिक विमा संरक्षण घ्यावे, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने लातूर यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या