लातूर पोलिस ला यश पोलिस स्टेशन देवणी येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक.*



               *पोलिस स्टेशन देवणी येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक.*




                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 15/06/2021 ते 16/ 06 /2021 चे दरम्यान रात्रीच्या वेळी वलांडी तालुका देवणी शिवारातील एका शेतात बालाजी बनसोडे, वय 35 वर्ष राहणार- बिहारीपूर ,तालुका मुखेड जिल्हा नांदेड याचा अज्ञात आरोपीतानी अज्ञात कारणासाठी  डोक्यात दगडाने मारून गंभीर दुखापत करून खून केला.  व पुरावा नष्ट करण्यासाठी बालाजी शेषराव बनसोडे याचे जवळील ओळखपत्र, मोबाईल ,कागदपत्र व बालाजी बनसोडे हा चालवीत असलेला महिंद्रा पिकअप घेऊन गेले. वगैरे फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोस्ट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 184 /2021 कलम 302, 201 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री.दिनेश कोल्हे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या होत्या.

        खून करण्याचा कारण व खून करणारे आरोपी हे अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता तयार करण्यात आलेल्या पथकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते.

                   सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू होते. तब्बल 21 दिवस अथक परिश्रम करून स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाला मिळालेल्या गोपनीय व विश्वासनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी

 1) विकास रघुनाथ सूर्यवंशी वय 29 वर्ष राहणार हेळंब 

2 )ज्ञानेश्वर भारत बोरसुरे वय 21 वर्ष यांना मौजे हेळंब तालुका देवनी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली. नमूद आरोपींनी सांगितले की, आम्हास उदगीर येथे जायचे असल्याने आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याचे वाहनास आडवे येऊन हात करून थांबविले होते त्याच  कारणावरून आमच्यात वाद झाला व त्या कारणावरून आम्ही बालाजी शेषराव बनसोडे याचे डोक्यात दगड घालून  गंभीर जखमी केले होते. त्यात  तो मरण पावला त्या नंतर त्यास उचलून एका शेताच्या बांधाच्या बाजूला टाकले व त्याचे खिशातील मोबाईल फोन पाकीट व त्याचे वाहन घेऊन फरार झालो होतो असे सांगितले. त्यावरून आरोपीना अटक करण्यात आले आहे.

                     सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता  स्थानिक गुन्हे शाखा लातूर चे पोलिस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे,पोलिस ठाणे देवणी येथील पोलिस निरीक्षक श्री.कामठेवाड यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, सफौ संजय भोसले,पोलीस अमलदार राजेंद्र टेंकाळे, रामहरी भोसले, राहुल सोनकांबळे, सदानंद योगी, योगेश गायकवाड ,सचिन धारेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खान, चालक अमलदार  जाधव तसेच सायबर शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड,पोलीस हवालदार संतोष देवडे ,राजेश कंचे प्रदीप स्वामी, गणेश साठे ,रियाज सौदागर, शैलेश सुळे यांनी परिश्रम घेतले.

                 गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस ठाणे देवणी येथील पोलिस निरीक्षक श्री.कामठेवाड हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या