महाविकास आघाडी सरकार चा महत्त्व पुर्ण निर्णय सरकारी अधिकारी कर्मचारी म्रुत्यु झाल्यास वारसास नोकरी!

 *महाविकास आघाडी सरकार चा महत्त्व पुर्ण निर्णय सरकारी अधिकारी कर्मचारी म्रुत्यु झाल्यास*                          

वारसास नोकरी





अल्ताफ शेख/प्रतिनिधी उस्मानाबाद

सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते, मात्र आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागु करण्यात येईल. 

   कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. आणि याच मागणी चा विचार करून मुख्यमंत्र्यांनी  कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. 

याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून “महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या