*नव्याने दारिद्र्य रेषेखालील नाव नोंदणी करून घेणे* अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद/ उमरगा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तालुक्यातील नागरिकांची दारिद्र्य रेषेखालील नाव नोंदणी करून घेणे आणि नव्याने राशन कार्डचीं फोड करून शिधापत्रिका वाटप करण्यात यावी या मागणीचे निवेदन गुरुवारी दि दोन रोजी तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अनेक अद्योग धंदे बंद पडले आहेत. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबंला उपास मारीची वेळ आली आहे. अनेक कुटुंबंला केशरी शिधा पत्रिका आहे त्यांची दारिद्र्य रेषेखाली नोंद असून त्याना राशन मिळेनासे झाले आहे.1998 सालच्या दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षण यादी नसून 2006 च्या सर्वेक्षण यादीत आहे असे तहसील कार्यालय, तलाठी, वं राशन दुकानदार यांचे म्हणणे आहे. केशरी कार्ड धारकांना बिपीएल कार्ड धारकांना राशन मिळते वं एपीएल कार्ड धारकांना रेशन मिळत नाही म्हणून तहसील कार्यालयाने नव्याने दारिद्र रेषेखालील नाव नोंदणी वं पंतप्रधानानी दिलेल्या सर्व सुविधाचा लाभ मिळवून द्यावा वं जनतेची हेळसांड थांबवावी असे त्यात म्हटले असून निवेदनावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुलोचना वेदपाठक, तालुका अध्यक्ष कैलास शिंदे, बालाजी जमादार, मल्लिकार्जुन साखरे, राजू मडियार, जयवंत कुळकर्णी कल्पना कलशेट्टी, उमादेवी कलशेट्टी, परविनं नंदाफ, मनीषा हराळे, पल्लवी औरादे आदी महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.